वरळी कोळीवाडयातील पाऊस .......
आनंद दायी की समस्या ......
वरळी कोळीवाड्यात रहाणाऱ्या सर्व रहिवाश्याना ....
मित्र हो निर्णय तुम्ही घ्या . आज वाढत्या शहरी करणात कदाचीत आपल्या दृष्टीस आले नसेल पण १० मिनिटे पाऊस पडला की आपल्या कोळीवाड्यात जणू काही पाण्याची नदी वाहते . पूर्ण रस्त्यावर एक लहान मुलाच्या ढोपरा एवढे पाणी साचते . गटार तुंबण्याचा विचार केला तर पाण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे . आणि बाकीच्या परिसराची तुलना केल्यास त्या परिसरात एवढे पाणी दिसत नाही . मग या बद्दल जाब कोणी विचारावा . कोळीवाड्याच्या बाहेर गेले की साचलेले पाणी दिसत नाही याचा अर्थ काय असावा ? हा प्रश्न मला सुद्धा पडतो . मग याचा आरोप कोणावर जावा गटारे साफ करणाऱ्यांवर ,पण ते तर नेहमी गटारे साफ करतानादिसतात , मग लोकांवर कारण कचरा गाडयांची सोय केली असताना ही पाणी साचले की ते पाण्यात कचरा टाकतात , इथे जबाबदार नागरिक म्हणवतात आणि पाऊस पडला दारा समोरून पाणी वाहु लागले की त्यात कचरा अगदी अभिमानाने टाकतात . अशा नागरिकांना काय म्हणावे ,सुसंकृत की असंस्कृत . विचार करा आपण त्या नागरिकां मध्ये येतो का ? देश तेव्हाच चांगला होईल जेव्हा आपण आपले कर्तव्य करू . गांधी जी म्हणाले होते आधी स्वतः बदला आस पास चे जग आपोआप बदलेल .
चला एक जबाबदार नागरिक म्हणून एक निर्धार करूया आजपासून घरातील कचरा हा नेहमी B.M.C च्या कचरा गाडीतच टाकायचा .
बदल हा लवकर घडत नाही पण काही वर्षातच आपल्या कोळीवाड्यातही
अजिबात पाणी साचणार नाही .
मी एक जागरूक नागरिक
माझे काही चुकले असेल तर क्षमस्व .......
धन्यवाद .....
No comments:
Post a Comment